डॉ. जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर डॉ. जयंत विष्णू नारळीकर : खगोलशास्त्रज्ञ अन् लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक आहेत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध गणितज्ज्ञ रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. १९५७मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए व पीएच.डी.च्या पदव्या मिळविल्या. शिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसेही त्यांनी पटकावली. नारळीकर यांचा विवाह १९६६मध्ये मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत. १९७२मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन स...