डॉ. जयंत विष्णू नारळीकर
डॉ. जयंत विष्णू नारळीकर
डॉ. जयंत विष्णू नारळीकर : खगोलशास्त्रज्ञ अन् लेखक
डॉ. जयंत विष्णू नारळीकर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक आहेत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध गणितज्ज्ञ रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. १९५७मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए व पीएच.डी.च्या पदव्या मिळविल्या. शिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसेही त्यांनी पटकावली.
नारळीकर यांचा विवाह १९६६मध्ये मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत. १९७२मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. १९८८मध्ये त्यांची पुणे येथील 'आयुका' संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर 'नभात हसते तारे' या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. 'पाहिलेले देश भेटलेली माणसं' हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत.
स्थिर स्थिती सिद्धांत...
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिणेही सुरूच आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
विज्ञानकथा-पुस्तके
'अंतराळातील भस्मासुर', 'अंतराळातील स्फोट', 'अभयारण्य', 'चला जाऊ अवकाश सफरीला', 'टाइम मशिनची किमया', 'प्रेषित', 'यक्षांची देणगी', 'याला जीवन ऐसे नाव', 'वामन परत न आला', 'व्हायरस'.
विज्ञानकथा-पुस्तके
'अंतराळातील भस्मासुर', 'अंतराळातील स्फोट', 'अभयारण्य', 'चला जाऊ अवकाश सफरीला', 'टाइम मशिनची किमया', 'प्रेषित', 'यक्षांची देणगी', 'याला जीवन ऐसे नाव', 'वामन परत न आला', 'व्हायरस'.
इतर विज्ञानविषयक पुस्तके
'अंतराळ आणि विज्ञान', 'आकाशाशी जडले नाते', 'गणितातील गमतीजमती', 'नभात हसरे तारे' (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), 'नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान', 'युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची' (आगामी), 'विश्वाची रचना', 'विज्ञान आणि वैज्ञानिक', 'विज्ञानगंगेची अवखळ वळणे', 'विज्ञानाची गरूडझेप', 'विज्ञानाचे रचयिते', समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक), 'सूर्याचा प्रकोप'
Name:- shritika Devendra chaudhari
Project subject:- डॉ. जयंत विष्णू नारळीकर
Class:- SYBSC
Roll no:- 23